
सागरी किनार्यावर २५ जूनपर्यंत उंच लाटा येण्याची शक्यता.
कोकण किनारपट्टीला सोमवारी २३ जून संध्याकाळी साडेपाच पासून २५ जून २०२५ ला रात्री ८.३० वाजेपर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने हा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सांगितले आहे.www.konkantoday.com