
रत्नागिरी नगर परिषदेचे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने अचानक काम बंद आंदोलन
रत्नागिरी शहरात घंटागाडीमार्फत कचरा गोळा केला जातो त्यामुळे रत्नागिरी शहर स्वच्छ ठेवण्यात नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे मात्र आज सकाळी
रत्नागिरी नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी अचानकपणे काम बंद आंदोलन पुकारले आहे या कामगारांना दोन महिन्याचा पगार मिळालेला नाही त्यांच्या मागणीकडे कोण लक्ष देत नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. कंत्राटी कामगारांनी अचानक कामबंदची दखल अद्याप नगर परिषद प्रशासनाकडून घेण्यात आलेले नाही