भूमिगत वीज केबल बिघडली, शेवटी महावितरणला यावे लागले ओव्हरवायरवर.

सध्या सुरू असलेल्या मुसळधार वादळी पावसाने महावितरणची चांगलीच झोप उडवली आहे. रत्नागिरी शहरात भूमिगत केबलद्वारे अनेक ठिकाणी वीज पुरवठा करण्यात आलेला आहे. परंतु ठेकेदाराने या केबलच्या केलेल्या बोगस कामाचे परिणाम रविवार रात्री त सोमवार दुपारपर्यंतच्या तब्बल सोळा तासभर शहरातील मच्छिमार्केट, झारणीरोड परिसरातील नागरिकांना सहन करण्याची वेळ आली परंतु महावितरणच्या पथकाने यावर मार्ग म्हणून ओव्हरहेड वायर टाकून या भागातील वीज पुरवठा सुरळीत केला.रत्नागिरी शहर परिसरातील अनेक भागात भूमिगत वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा नागरिकांना करण्यात आला आहे. पण त्या वीजवाहिन्यांच्या कामात काही डिपी हे गटारांवर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे गटारांमधून येणारे उंदिर, घुशी यांनीही डिपीमध्ये शिरकाव केला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भागात वारंवार वीज जाण्याचे प्रकार पाऊस सुरू झाल्यापासून घडत आहेत. भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम करणार्‍या ठेकेदाराने मागील काही दिवस वीज खंडित होण्याच्या प्रकारावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले परंतु त्याला यश आले नाही.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button