चिपळुणात शेतकरी हवालदिल, युरिया खताचा तुटवडा.

सध्या अनेक शेतकर्‍यांना गरज असतानाही युरिया खताचा येथे तुटवडा भासत आहे. तालुक्यासाठी १ हजार मेट्रीक टन खताची गरज असतानाही ५०० मेट्रीक टन खत येथे उपलब्ध झाले होते. यामुळे ज्यांना खत मिळालेले नाही, असे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी मनसे २३ रोजी तालुका कृषी कार्यालयावर धडक देणार आहे.गेल्या काही वर्षाचा विचार करता बदलणार्‍या नैसर्गिक घडामोडीमुळे शेतकरीवर्ग अडचणीत येताना दिसत आहे. त्यातच मजूर मिळत नसल्याने शेती करण्याचे प्रमाणही कमी होत आहे. असे असताना जे शेतकरी शेती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांनाही शासन वेळेत आवश्यक सुविधा देत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button