हरचिरी पंचक्रोशीत सध्या बिबट्याची दहशत

रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी पंचक्रोशीत सध्या बिबट्याने दहशत माजवली आहे. तर माकडांच्याही उपद्रवाने शेतकरी हैराण झघले आहेत. तरी वनविभागाने हरचिरी विभागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पत्रकार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे हरचिरी गावचे माजी उपसरपंच प्रवीण कोळापटे यांनी केली आहे.

या पंचक्रोशीत बिबट्याच्या मुक्त संचाराने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. अनेकांना रात्रीच्या सुमारास दर्शनही झघले आहे. तर काही शेतकर्‍यांनी वरच्या हरचिरी परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचे बछडेही नजरेस पडले आहेत. गेल्या १५ दिवसात पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. बौद्धवाडी येथे रात्री गोठ्यात शिरून जनावरांवर हल्ला करण्यात आला. त्यात एक वासरू ठार झाले. अहिल्यानगर परिसरात पहाटे पिंजर्‍यात बांधलेल्या कुत्रीवर पिंजरा उघडून बिबट्याने हल्ला केला पण सुदैवाने कुत्रीच्या गळ्यात साखळी असल्याने कुत्री बचावली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button