
रत्नागिरी ते हातखंबा भागात मिर्या-नागपूर महामार्गाची झालीय दुरवस्था.
मिर्या-नागपूर महामार्गावरील चांदसूर्या परिसरासह पानवळ, खेडशी, कारवांचीवाडी रेल्वे स्टेशन, डीमार्टसमोरील डायव्हर्जन भागांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसामुळे आधीच परिस्थिती बिकट असताना, रस्त्यात टाकलेली माती उखडून चिखल तयार होत असून अपघाताचे गंभीर धोके निर्माण झाले आहेत.
या मार्गिकांवरील डांबरीकरण अपुरे राहिलेले असून काही ठिकाणी फक्त (ग्रॅन्युलर सब बेस) थर टाकून काम अर्धवट सोडले आहे. या थरावरून वाहने चालवणे म्हणजे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे पानवळ, खेडशी, कारवांचीवाडी रेल्वे स्टेशन, कुवारबांव, जे. के. फाईल्स या भागात डायव्हर्जन करून वाहतूक वळविण्यात आलेली असून त्याच ठिकाणी चिखल, खडी आणि खड्ड्यांमुळे गोंधळाचे वातावरण आहे.www.konkantoday.com