
आतापासून निवडणुकीचा विचार करण्याऐवजी पक्ष संघटना वाढीवर आमचा भर-भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या आहेत. या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांना बळ मिळत असते असे त्यांनी सांगितले.महायुती म्हणूनच पुढील निवडणुका लढल्या जातील, आचारसंहिता लागू झाल्यावर पार्लमेंटरी बोर्ड यावर निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय महायुतीच्या नेतेमंडळींना मान्य असतो. त्यामुळे आतापासून निवडणुकीचा विचार करण्याऐवजी पक्ष संघटना वाढीवर आम्ही भर दिला असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केलेरत्नागिरी दौर्यावर आलेल्या आ. रविंद्र चव्हाण यांनी भाजपाच्या कार्यालयात भेट देऊन पदाधिकार्यांशी चर्चा केली. त्यानंतर भाजपाच्या रत्नागिरी दक्षिण आणि रत्नागिरी उत्तरच्या पदाधिकार्यांशी त्यांनी संवाद साधला. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीकडून देशभर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी संघटन पर्व कार्यक्रम सुरु आहे.
राज्यात 80 संघटनात्मक जिल्ह्यांची रचना करण्यात आली आहे. 1214 मंडले तयार करण्याचे काम सुरु असून, पदाधिकार्यांवर प्राथामिक जबाबदार्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पदाधिकार्याकडून कामांची माहिती घेतली जात आहे. विविध उपक्रमांचे माहिती त्यात्यावेळी वरिष्ठ पातळीवरुन घेण्यात येत आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामाचे मुल्यमापन वरिष्ठ पातळीवरुन सुरु असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले. 25 जूनपयर्र्त महत्वाच्या नेमणूका करुन मंडल रचना पूर्ण करण्याची प्रक्रिया होईल असेही त्यांनी सांगितले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर दरम्यान लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी बांधणी सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या आहेत. या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांना बळ मिळत असते असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आदी उपस्थित होते.