मुसळधार पावसाचा महावितरणला मोठा फटका, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागात ९८,४०० वीजग्राहक होते अंधारात.

गेले चार दिवस कोसळणार्‍या मुसळधार पावसाचा परिणाम महावितरण कंपनीला मोठा फटका बसला आहे. वादळी वारा व पावसामुळे कोकण परिमंडळातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विभागातील एकूण २२१ गावांतील ९८ हजार ४०० गावांतील ९८ हजार ४०० वीजग्राहकांना अंधारात राहण्याची वेळ आली.

महावितरण कर्मचार्‍यांच्या अथक प्रयत्नानंतर मंगळवारपर्यंत ९७ हजार ९७० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले होते.१५ ते १६ जून या कालावधीत दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग विभागालाही मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. या झालेल्या वादळी वारा व पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा बाधित झाला. खांब पडणे, वीज यंत्रणेवर झाड पडणे आदी कारणांमुळे हा पुरवठा बांधित आहे. ग्राहकांचा वीजपुरवठा लवकर सुरू करण्यासाठी महावितरण कर्मचारी व अधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button