गावात नेटवर्क नसल्याने महावितरणाने स्मार्ट मीटर बसविण्याचे काम थांबविले.

महावितरणकडून जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या कार्यवाहीला प्रारंभ करण्यात आला. आतापर्यंत सुमारे ६ हजार स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत पण त्या गावांमध्ये नेटवर्क नसल्याने ग्राहकांची वीज वापराचा डिजिटल डाटा मिळण्यात महावितरणसमोर मोठा अडचर निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी नेटवर्क नाही अशा ठिकाणी महावितरण कंपनीला पुन्हा घरोघरी जावून स्मार्ट मीटरमधील रिडींग घेण्याची वेळ आल्याने स्मार्ट मीटर बसविण्याचे काम थांबवण्यात आले आहे.स्मार्ट मीटर बसविण्याच्या या कार्यवाहीत सुरूवातीला शासकीय, निमशासकीय कार्यालये व एजन्सीनी हे मीटर बसविले. आता जिल्ह्यात सर्वत्र मीटर बसविण्याचे काम सुरू झाले असतानाही त्याला विरोध होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button