
कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या वंदे भारतचे स्वातंत्र्यदिनीचे बुकींग ५८ दिवस आधीच फुल्ल.
गतवर्षी प्रमाणेच यावर्षीही १५ ऑगस्ट रोजी धावणारी मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ५८ दिवस आधीच हाऊसफुल्ल झाली आहे. रिग्रेटचा शेरा मिळत असल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. सर्वच फेर्यांना उदंड प्रतिसाद असल्यामुळे एक्सप्रेस १६ किंवा ३० डब्यांची चालवण्याचा मागणीने जोर धरला आहे.मडगांव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस २८ जून २०२३ पासून कोकण मार्गावर धावू लागल्यापासून पहिल्याच फेरीपासून एक्सप्रेसच्या आजवर धावलेल्या फेर्या हाऊसफुल्ल धावल्या आहेत. गणेशोत्सव, दीपावली सुट्टीच्या हंगामासह शिमगोत्सवातील सर्वच फेर्यांचे आरक्षण खुले होताच हाऊसफुल्ल झाले होते.एकीकडे वंदे भारत एक्सप्रेसच्या फेर्यांना उदंड प्रतिसाद लाभत असतानाही केवळ ८ डब्यांच्या धावणार्या एक्सप्रेसच्या फेर्यांमुळे सुपरफास्ट एक्सप्रेसमधून प्रवास करण्याची संधी हुकत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा हिरमोड होत आहे. याचमुळे एक्सप्रेसला आणखी ८ डबे जोडण्याचा आग्रह गेल्या दीड वर्षापासून करण्यात येत आहे. मात्र अद्यापही रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.www.konkantoday.com




