रत्नागिरी येथील दामले विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत आयोजित शाळा भेट उपक्रमास पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती


रत्नागिरी येथील दामले विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत आयोजित शाळा भेट उपक्रमास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात व फुलांच्या वर्षावात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले.

रत्नागिरी नगरपरिषदेची दामले विद्यालय ही शाळा संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत ठरत आहे. पहिलीच्या वर्गात १८६ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अजूनही पालकांची प्रवेशासाठी रांग लागलेली आहे, ही बाब अभूतपूर्व आहे.
या शाळेच्या यशापासून प्रेरणा घेऊन जिल्ह्यातील इतर सर्व शाळांचा पट देखील वाढेल आणि खऱ्या अर्थाने रत्नागिरी जिल्हा शिक्षणाच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवेल, असा विश्वास मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.

रत्नागिरीकरांनी जर ठरवलं, तर नगरपरिषदेच्या शाळांचाही पट वाढू शकतो. म्हणूनच आज दामले विद्यालयात एकूण १४७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि फक्त पहिलीच्या वर्गातच १८६ विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. १५ कोटी रुपये खर्चून उभी राहत असलेली ही शाळेची नवीन इमारत ही राज्यातील नगरपरिषदेच्या शाळांमधील एकमेव सुसज्ज इमारत ठरणार आहे, असेही यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी कासार, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे, माजी पंचायत समिती सभापती बाबू म्हाप, तहसीलदार राजाराम म्हात्रे, तसेच दामले विद्यालयातील सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button