कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्‍या वंदे भारत १६ ते २० डब्यांची चालवा, कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी.

कोकण मार्गावरून धावणार्‍या सीएसएमटी मडगांव वंदे भारत एक्सप्रेसच्या फेर्‍यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. सद्यस्थितीत सुपरफास्ट एक्सप्रेस ८ डब्यांची धावत आहे. हे डबे अपुरे पडत आहेत. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवावी. अशा मागणीचे निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वे बोर्डाला दिले आहे.जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसशी तिचे एकीकरण करण्याचा निर्णय अलिकडेच रेल्वे बोर्डाने घेतला आहे. या डब्यांची प्राथमिक देखभाल आता नांदेडला हलवण्यात आली आहे. यामुळे मुंबईत पिट लाईन आणि देखभाल स्लॉट उपलब्ध झाला आहे.कोकण मार्गावरून धावणार्‍या वंदे भारत एक्सप्रेसने ९५ टक्के आसन क्षमतेची प्रभावी अंमलबजावणी राखली आहे. यामुळे सध्या धावणारी ८ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांसाठी आसनांअभावी गैरसोयीची ठरत आहे. यामुळे एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आर्जवही करण्यात आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button