
रत्नागिरी जिल्ह्यात चार महिन्यात १२ बेवारस मृतदेह, घातपाताची शक्यता.
रत्नागिरी जिल्ह्यात फेब्रुवारी-१, मार्च-४, एप्रिल-३ व मे मध्ये -४ असे एकूण १२ मृतदेह आढळले आहेत. या बारा मृतदेहांची ओळख पटवून हा गुन्हा निकाली काढण्याच्यादृष्टीने पोलिसांचा प्रयत्न आहे.अनेक मृतदेह सडलेले किंवा अगदी सांगाडा सापडतो; परंतु तो घातपात असल्याचा संशय असला तर पोलिसांना अशा घटनेतील धागेदोरे गोळा करून माग काढावा लागतो. टॅटू, गोंदण, खिशातील साहित्यामुळे ओळख पटते; परंतु अनेकवेळा ओळख पटवण्यात अपयश येते आणि त्या घटनेचा छडा लागत नाही.
गेल्या ५ महिन्यात जिल्ह्यात असे १२ बेवारस मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. जिल्हा पोलीस दलाने मृतदेहावरील टॅटू आणि गोंदण यावरून त्याची ओळख पटविण्याबरोबर घातपाताचेही प्रकार उघडकीस आणले आहेत. पण बरेचवेळा अनेक घटनांमध्ये मृतदेह बर्याच दिवसांचा, कुजलेला, चेहरा विद्रुप असा असल्याने ओळख पटवणे कठीण होते.www.konkantoday.com