
पाऊस कमी होताच मृग नक्षत्राच्या महुर्तावर शेतकर्यांची पेरणीची लगबग.
मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली. सलग दहा दिवस जिल्ह्यात संततधार पर्जन्यवृष्टी झाली; परंतु त्या काळात पेरणी करणे अशक्य होते. त्यामुळे पाऊस थांबताच शेतकर्यांनी मृग मक्षत्राच्या मुहूर्तावर पेरण्यांच्या कामाला प्रारंभ केला.जिल्ह्याचे मुख्य पीक भात, तर दुय्यम पीक नागली असून, जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी रोपे काढून लागवड पद्धत अवलंबली जाते. जिल्ह्यात एकूण ७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जात असून, आतापर्यंत एकूण २,५४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.www.konkantoday.com