
रत्नागिरीत उभारण्यात येणाऱ्या पत्रकार भवनाला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव
आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी टिळक आळी, रत्नागिरी येथे आयोजित बैठकीस उपस्थित राहून “दर्पण”कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दालन उभारणीसंदर्भात विचारमंथन करण्यात आले.
या प्रसंगी रवींद्र बेडीकीहाळ लिखित “आचार्य बाळशास्त्री जांभेकर : कर्तृत्वाचा एक शोध” हे पुस्तक देऊन मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या सन्मान करण्यात आला. याबद्दल मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या वेळी रत्नागिरीत उभारण्यात येणाऱ्या पत्रकार भवनाला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. तसेच पत्रकार-साहित्यिक संमेलन रत्नागिरी येथे आयोजित व्हावे, यावरही सविस्तर चर्चा झाली.
या महत्त्वपूर्ण बैठकीस ज्येष्ठ संपादक श्री. राजाभाऊ लिमये, श्री. राजीव लिमये, श्री. श्रीकांत भिडे आदी उपस्थित होते .