राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथील एका १३ वर्षीय मुलीचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू


राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथील एका १३ वर्षीय मुलीचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. स्वरांगी संदीप गिजम (13, गिजमवाडी, धाऊलवल्ली राजापूर) असे या मृत मुलीचे नाव असून, या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
संदीप गिजम यांचे कुटुंबीय शेतातील कामासाठी घराबाहेर गेले होते. त्यांची मुलगी स्वरांगी ही एकटीच घरी होती. यावेळी घरातील पंख्याच्या उघड्या वायरला तिचा स्पर्श झाला आणि तिला विजेचा तीव्र धक्का बसला. मात्र घरी कोणीच नसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
शेतातील काम आटोपून कुटुंबीय घरी परतल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button