महामार्गावर आता तीन अपघातप्रवण ठिकाणी गतिराेधक बसवणार.m

नुकत्याच चिपळूण-बावनदी येथे झालेल्या अपघातानंतर आता राष्ट्रीय महामार्ग विभागाने अपघातप्रवण क्षेत्रासंदर्भात महत्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महामार्गावरील बावनदीसह, अंजणारी आणि वेरळ येथे आता गतिराेधक बसवण्यात यावा, या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाèयांकडे सादर करण्यात आला आहे. खासदारांच्या अध्यक्षतेखाली हाेणाèया अपघात निवारण समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले. मुंबई-गाेवा महामार्गावरील काही ठिकाणे ही सातत्याने हाेणाèया अपघातानंतर आता अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखली जावू लागली आहेत. अशा अपघातप्रवण क्षेत्रावर आता गतिराेधक बसवण्यासंदर्भात प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जिल्हाधिकाèयांना देण्यात आला आहे. नुकताच बावनदी येथे एका गॅसवाहू टँकरने प्रशिक्षणासाठी निघालेल्या शिक्षकांच्या मिनी बसला टक्कर दिली आणि या अपघातात 31 जण जखमी झाले. यापैकी तिघेजण गंभीर जखमी झाले. या अपघातातनंतर आता बावनदी परिसरात सतत हाेणाèया अपघाताच्या प्रमाणाकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. महामार्गाचे काम सुरु असल्यापासून या परिसरात 20 पेक्षा जास्त अपघात झाल्याचे आता समाेर आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button