
मुंबई-गोवा महामार्गावर निवळीतील अपघातानंतरच्या गॅसगळतीचा चार घरांना फटका.
मुंबई-गोवा महामार्गावर बावनदीजवच्या निवळी घाटात एलपी गॅस वाहतूक करणारा टँकर व मिनीबस यांची टक्कर होवून झालेल्या अपघातानंतर गॅस गळतीने लागलेल्या आगीत परिसरात चार घरांचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत ४ घरांसह रिक्षा, कार, मोटारसायकल व इतर साहित्याचे सुमारे २५ लाखांचे नुकसान झघले आहे.रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात २६ प्राथमिक शिक्षक जखमी झाले.
अपघातानंतर टँकरही उलटल्याने त्यातून गॅस मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. त्यामुळे परिसरातील दोन घरे, रिक्षा आणि एका झोपडला आग लागून मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात धोकादायक स्थिती निर्माण झाल्याने पोलीस यंत्रणेने महामार्गावरील वाहतूक बंद केली होती. छोट्या गाड्या अन्य मार्गावरून वळविल्या होत्या.www.konkantoday.com