वाशी-पनवेल रेल्वेसेवा ठप्प; नेरुळमध्ये सिग्नल यंत्रणा बिघडल्यामुळे हार्बर-ट्रान्स हार्बरवरील वाहतूक विस्कळीत.

मुंब्रा येथील रेल्वे दुर्घटनेनंतर मुंबईसह ठाणे-डोंबिवलीतील नागरिकांमधून रेल्वे प्रशासन व सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक झाली असून आज मनसे ठाण्यातील गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्टेशन असा धडक मोर्चा काढणार आहे. मुंब्र्यातील घटनेनंतर उमटणारे पडसाद व राजकीय प्रतिक्रियांकडे आपलं लक्ष असेल. यासंबंधीच्या बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच इतर राजकीय घडामोडींकडेही आपण लक्ष ठेवणार आहोत. जसे की आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मेळावे होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध देशांच्या दौऱ्यांवर गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळांची आज भेट घेणार आहेत याकडे आपलं लक्ष असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button