रत्नागिरी शहराने मोकळा श्वास घेतला ,विनापरवाना होल्डिंग विरुद्ध नगर परिषदेची कारवाई सुरू.

रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणावर गेल्या काही वर्षात लोखंडी होल्डिंग उभारण्याचे पेव फुटले होते विशेषतः सरकारी कार्यालयाच्या दर्शनी बाहेरील बाजूस मोठ्या प्रमाणावर होल्डिंग उभारणी करण्यात आली होती त्यामुळे सरकारी कार्यालयांचे अस्तित्वच दिसेनासे झाले होते मध्यंतरी खुद्द नगर परिषदेच्या समोरच अनेक होल्डिंग उभारण्याचा प्रयत्न झाला होता मात्र त्याला विरोध झाल्याने ते थांबवण्यात आले मात्र शहरात मोक्याच्या ठिकाणी उदाहरणार्थ जयस्तंभ, मारुती मंदिर, जेल नाका येथे एकावर एक होल्डिंग उभी करण्यात आली होती

रत्नागिरी जयस्तंभ सर्कलच्या बाजूला होल्डिंगची एवढी रांग होती की ज्यामुळे तेथे असलेल्या बागेचे अस्तित्वही नष्ट झाले होते याशिवाय कोकणातील मुसळधार पाऊस वादळ वारे पाहता एकावर एक उभी केलेली होल्डिंग धोकादायकही ठरणार होती होल्डिंगच्या अतिरेकामुळे शहरात अनेक ठिकाणी सौंदर्याला बाधाही येत होती मध्यंतरी पालकमंत्री उदय सामंत यांनी अनधिकृत होल्डिंग वर कारवाई करण्यात येईल असे जाहीर केले होते त्यानुसार आता कारवाई सुरू झाली आहे मात्र या होल्डिंगच्या उभारणीसाठी रत्नागिरी नगर परिषदेनेच परवानगी दिली होती ती कोणत्या आधारे दिली याची चौकशी होणे गरजेचे आहे.

रत्नागिरी नगरपरिषद नाम मात्र भुई भाड्यात होल्डिंग साठी जागा देते रत्नागिरी शहरात आता तारांगण, मल्टीमीडिया शिव छत्रपती संभाजी महाराजांचा जिजामाता उद्यानातील पुतळा याशिवाय भगवती किल्ला येथे उभारण्यात आलेली शिवसृष्टी अशा अनेक पर्यटकांना आकर्षित करणारे प्रकल्प पालकमंत्री मंत्री उदय सामंत यांनी उभारले आहेत मात्र त्याची माहिती देण्यासाठी नगरपरिषद कडे स्वतःचे कोणतेच होल्डिंग किंवा जागा नाही त्यामुळे पर्यटकांना त्याची माहिती मिळू शकत नाही त्यामुळे लाकडी चौकटीला फ्लेक्स लावून नगरपरिषद या प्रकल्पाची माहिती देण्याचा केविलवाणा प्रयत्न करते स्वतः नगर परिषदेने कायमस्वरूपी शहरात उभारण्यात आलेल्या पर्यटन प्रकल्पाची पर्यटकांना माहिती देण्यासाठी होल्डिंग उभारून पर्यटकांना माहिती उपलब्ध करून द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button