२० वर्षांत तब्बल ५१ हजार रेल्वे प्रवाशांनी गमावले प्राण; परंतु रेल्वे प्रशासन ढिम्मच !

:* मुंबईजवळ दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मोठा रेल्वे अपघात झाला आहे. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जणाऱ्या लोकल रेल्वेमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सकाळी ९.२० च्या दरम्यान, दिवा व मुंब्रा स्थानकांच्या दरम्यान ही घटना घडली आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाज्यात (फूटबोर्ड) लटकत उभे होते. त्याचवेळी बाजूने जाणारी लोकल या प्रवाशांना घासून गेली. या लोकलच्या धक्क्याने आठ प्रवासी दरवाजातून खाली पडले. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.मुंबईजवळील दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान सोमवारी सकाळी कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून पाच प्रवाशांनी जीव गमावला.

सकाळी सुमारे ९.२० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी दरवाजात लटकत उभे होते. याच दरम्यान, विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या दुसऱ्या लोकलची त्यांना धडक बसली. धक्क्याचा जोर इतका होता की आठ प्रवासी खाली फेकले गेले. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित तिघे गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे रेल्वे प्रशासन, सुरक्षा व्यवस्था आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

दरम्यान गेल्या २० वर्षांत मुंबईत लोकल रेल्वे गाड्यांमध्ये ५१,००० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, असे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने ऑगस्ट २०२४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गांवरील लोकल गाड्यांच्या अपघातांमध्ये २२,४८१ प्रवाशांचा, तर मध्य रेल्वे मार्गांवरील लोकल गाड्यांच्या अपघातांमध्ये २९,३२१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. लोकल रेल्वे गाड्यांमध्ये अपघातांमुळे होणारी मृत्युची संख्या जास्त असल्याचे निदर्शनास आणून देणाऱ्या यतीन जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने ही माहिती सादर केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button