मुंबई महामार्गावर अपघातानंतर गॅस टँकर मधील गॅस लिकेजमुळे बंद असलेली वाहतूक रात्रौ उशिरा सुरू करण्यास प्रशासनाला यश


मुंबई गोवा महामार्गांवर निवळी बावनदी येथे काल सकाळी टँकर आणि मिनी बस च्या भीषण अपघात झाला होता यामध्ये 27 जण जखमी झाले होते या अपघातानंतर गॅस टँकर पलटल्याने यामधून मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू झाली होती त्यामुळे प्रशासनाने घटनास्थळी जाऊन या टँकर मधील गॅस रिकामा करण्याची प्रक्रिया सुरू केली होती याकरता या मार्गावरील वाहतूक व निवळी घाटातील वाहतूक सुमारे १७ तास बंद होती रात्री उशिरापर्यंत हे गॅस रिकामा करण्याचे काम सुरू होते
सर्व प्रशासनाच्या यंत्रणा व कर्मचाऱ्यांनी अविरत प्रयत्नानंतर वाहतूक मध्य रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सुरु झाली आहे तशी माहिती सूत्राकडून उपलब्ध झाली आहे यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी निश्वास सोडला आहे गेले काही त्यास पर्यायी मार्गानी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती वाहतूक सुरू झाल्याबद्दल अधिकृतरित्या पोलिसांकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button