मुंबईत मोठी दुर्घटना ,लोकल अन् पुष्पक एक्सप्रेस एकमेंकांना घासल्या, १२ जण ट्रॅकवर पडले, ५ जणांचा मृत्यू


मुंबई लोकलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे भयंकर घटना. लोकलच्या दारात उभं असणारे ८ ते १० प्रवासी धावत्या ट्रेनमधून पटरीवर पडल्याचे समोर आले आहे.गर्दी असल्यामुळे मिळेल ती लोकल पकडून मुंबईकर कामासाठी निघाले होते, पण या भयंकर घटनेनुळे ८-१० जण गंभीर जखमी झाल्याचे समजतेय. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समजतेय.

ही दुर्घटना सकाळच्या गर्दीच्या वेळेस घडल्याने प्रचंड घबराट उडाली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून रेल्वेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. संपूर्ण तपास सुरू करण्यात आला आहे.

दिवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान आज सकाळी ९ ते ९.१५ वाजण्याच्या दरम्यान लोकल आणि एक्सप्रेस एकमेकांना घासल्याचे समोर आले आहे. कल्याणहून सीएमएमटीसाठी निघालेली ८.३६ वाजताची लोकल दिवा ते मुंब्रा स्थनकादरम्यान दुसऱ्या पटरीवर धावणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला घासली. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. रेल्वे पटरीवर १० ते १० प्रवासी रूळावर पडल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत ५ जणांच मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button