
निवे धरण परिसराच्या पाहणीसाठी भूगर्भ शास्त्रज्ञ आले, जमीन खचण्यााचे कारण स्पष्ट झाले नाही
रत्नागिरी ः संगमेश्वर-निवे बुद्रूक जोशीवाडी येथे धरणाच्या बाजूला असलेल्या जमिनीला अचानक भेगा पडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. या धरणाच्या बाजूला असलेल्या जोशी यांच्या बागेत मोठ्या प्रमाणावर भुस्खलन झाल्याने काजू, आंबा, नारळीचे नुकसान झाले होते. यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांचे पथक घटनास्थळी आले होते. या पथकाने जमिनीची पाहणी केली. मात्र जमीन खचण्याचा प्रकार कशामुळे झाला ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. भूगर्भशास्त्रज्ञांच्या अहवालानंतरच ते स्पष्ट होणार आहे.