जिल्ह्यात बळीराज सेना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविणार – जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांची माहिती

आबलोली :आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बळीराज सेना आपले उमेदवार देणार असल्याचे संकेत जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी दिले आहेत या बाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बळीराज सेनेचे जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी सांगितले आहे की, आमच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे सक्षम कार्यकर्ते यांना या निवडणुकीत उतरविण्याचा विचार आहे. मंडणगड,दापोली, खेड, चिपळूण व गुहागर मध्ये उमेदवार तयार आहेत तर दक्षिण रत्नागिरी मधील तालुक्यातील उमेदवार निश्चित होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

बळीराज सेना ही सर्व सामान्य जनतेची आहे उच्च शिक्षित नवं तरुण कार्यकर्ते यांना या निवडणुकीत संधी देणार आहे असेही जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी सांगितलेआहे. येत्या काही दिवसात नियोजित कोकण दौरा करण्यात येणार असून बळीराज सेनेच्या वतीने गाव पातळीवर उमेदवार संदर्भात चाचपणी करण्यात येणार आहे असे जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी सांगितले.

दरम्यान कोकणात बळीराज सेना पक्षाचे वतीने स्वतंत्र उमेदवार आगामी निवडणुकीत देण्यात येणार असून मतांचे विभाजन होणार आहे तरीही बळीराज सेनेची ताकद मोठी आहे कारण या पक्षाकडे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि हे सर्व कार्यकर्ते पक्षाशी प्रमाणिक आहेत व जनतेची कामेहि ते प्रामाणिक पणे करताहेत त्यामुळे आम्हाला यश मिळणार हे नक्की आहे असेहि बळीराज सेनेचे जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button