
मंत्री नितेश राणे यांनी कडक कारवाई करूनही काही भागात एलईडी मासेमारीचा धुमाकूळ सुरूच.
अवैध एलईडी पर्ससीन मासेमारीविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश मत्स्य विकास मंत्री नीतेश राणे यांनी देऊनसुद्धा रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर एलईडी पर्ससीन नौकांचा धुमाकूळ सुरूच आहे. मागील ३ महिन्यात दोन्ही जिल्ह्यातील काही एलईडी नौका मत्स्य विभागाकडून पकडण्यात आल्या होत्या. परंतु या कारवाईचा धाक एलईडी नौकाधारकांना अजिबात राहिलेला नाही. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे एलईडी नौकाधारक मत्स्य विकास मंत्र्यांच्या भूमिकेलाच आव्हान देत असतील तर सर्वसामान्य मच्छिमारांनी दाद मागायची तरी कुणाकडे असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे.
काही बेकायदेशीर एलईडी नौकांही पकडलेल्या आहेत. मागील काही वर्षातील कारवाईच्या तुलनेत गेल्या ३ महिन्यात झालेल्या कारवाईचे प्रमाण नक्कीच चांगले आहे परंतु या कारवाईनंतर एलईडी मासेमारी पूर्णतः बंद झाली आहे, असे मुळीच नाहीय. रत्नागिरीत झालेल्या कारवाईनंतर एलईडीधारकांनी आपला मोर्चा गुहागरकडे वळविल्याची बाब समोर आली होती. सिंधुदुर्गात देवगड तालुक्यात कारवाई होत असल्याने येथील एलईडीधारक मालवण ते वेंगुल्यापर्यंतच्या समुद्रात तळ ठोकून आहेत. रात्रीच्यावेळी या नौकांचा लखलखाट स्पष्टपणे किनार्यावरून दिसतो.www.konkantoday.com