पर्यटन थांबले, तिन्ही हाऊसबोट आल्या किनार्‍यावर.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील उमेदच्या महिला प्रभागसंघांना देण्यात आलेल्या हाऊसबोट आता पावसाळी वातावरणात किनार्‍यावर नांगरण्यात आल्या आहेत. तालुक्यातील कोतवडे आणि वाटद प्रभागांता देण्यात आलेल्या हाऊसबोट तवसाळ खाड़ी किनार्‍यावर उभ्या करण्यात आल्या आहेत. तर चिपळूण तालुक्यातील मालदोली प्रभागाची बोटही इथल्या खाडीकिनार्‍यावर उभी करण्यात आली आहे. पावसाळी हंगामानंतर सप्टेंबर महिन्यात हवामानाचा अंदाज घेऊन मगच या हाऊसबोटी पुन्हा पर्यटन व्यवसायासाठी सज्ज होणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, गुहागर, मंडणगड, राजापूर, दापोली आणि चिपळूण या तालुक्यातील बचतगटाच्या महिलांनी आता हाऊसबोट प्रकल्पाचा प्रस्ताव सिंधुरत्न संमृद्धी योजनेतून सादर केला होता. या प्रकल्पाना मंजुरी मिळून जिल्ह्यातील पाच  प्रभागसंघाना  हाऊसबोटीसाठी  प्रत्येकी १ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  यापैकी रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथील जीवनज्योती महिला प्रभागसंघ आणि कोतवडे येथील एकता प्रभागसंघाच्या हाऊसबोटीचे लोकार्पण  कोटी प्रमाणे ५ करण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button