प्रवाशांची गैरसोय दूर झाली, मिर्‍या-नागपूरवर प्रवासी निवारा शेड उभारल्या.

रत्नागिरी मिर्‍या ते नागपूर या महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे या महामार्गावर पूर्वीपासून असलेल्या प्रवासी थांब्यावर निवारा शेड जमीनदोस्त करण्यात आल्या. महामार्गाचे काम सर्वत्र सुरू असल्याने त्या बसथांब्यावर शेडअभावी प्रवाशांना उन-पावसाचा मारा झेलत उभे राहण्याची वेळ आली होती. पण आता बहुतांश बसथांब्यांवर तात्पुरत्या निवारा शेडची व्यवस्था करण्यात आल्याने प्रवासीवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.मिर्‍या-नागपूर महामार्गाच्या सुरु असलेल्या कामामुळे रूंदीकरणासाठी सर्वच बस थांब्यांवर असलेली प्रवासी निवारा शेड पाडण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना काम सुरू असलेल्या या महामार्गाच्या मध्येच धुळीतच उभे राहण्याची वेळ आली होती.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button