
दैव बलवत्तर म्हणून ट्रक कारवर कोसळूनही कारमधील प्रवासी बचावले
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणार्या माणगाव येथे टेमपाले उड्डाण पुलावर ट्रक कारवर कोसळून भीषण अपघातातून गोव्याला जाणारे कारमधील प्रवासी सुदैवाने बचावले आहे. हा अपघात गुरुवारी झाला. या अपघातात धनंजय चंद्रभान चौधरी (२० वर्षे, राहणार मुंबई), साहील धमेन्द्र कमार गुप्ता (१९ वर्षे, राहणार मुंबई), संजय चंद्रभान चौधरी (२२), चंद्रकांत रामदास लडकत(२५) हे चारजण जखमी झाले आहेत. संजय चंद्रभान चौधरी यांनी चंद्रकांत रामदास लडकतविरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.संजय चौधरी हे आपल्या कारने मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघाले होते. यावेळी महाडकडून माणगांवकडे येत असलेल्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि कारला समोरुन धडक बसली.त्यानंतर हा ट्रक कारवर कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहने उड्डाण पुलावरुन खाली कोसळता-कोसळता वाचली आणि मोठा अनर्थ टळला. अपघातात कुठलीही जीवितहानी नाहीwww.konkantoday.com