राज्यात कुठलाही पशू बाजार बंद राहणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


महाराष्ट्रात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू बाजार बंद करण्याचा निर्णय राज्यातील महायुती सरकारने मागे घेतला आहे. ३ ते ७ जूनदरम्यान पशू बाजार बंद ठेवण्याच्या आधीच्या आदेशावरून निर्माण झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे पुनर्विचार करत सरकारने तो आदेश मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.राज्यात कुठलाही पशू बाजार बंद राहणार नाही,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. यामुळे राज्यभरातील मुस्लिम समाजात समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, ३ ते ८ जूनदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (APMCs) जनावरांची बाजारपेठ भरवू नये, असा सल्ला महाराष्ट्र गौसेवा आयोगाने दिला होता. मात्र या सल्ल्यावर राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र टीका झाली. परिणामी, आयोगाने आपला ७ मे रोजीचा सल्ला मंगळवारी अधिकृतरित्या मागे घेतला. आता केवळ गाय व तिच्या वंशाच्या खरेदी-विक्रीवर पूर्वीप्रमाणेच बंदी कायम राहणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button