
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ७२ हजार ७२८ लोकांना मौखिक कॅन्सरविषयी समुपदेशन.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व विविध उपक्रमांच्या माध्यमातून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सोडविण्यासाठी साठी जिल्ह्यात आतापर्यंत आतापर्यंत ७२ हजार ७२८ लोकांना समुपदेशन करण्यात आले. ३७५ आरोग्य शिबिरांद्वारे २३ हजार ४०४ लोकांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तर जिल्हा, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात ओपीडी अथवा आरोग्य शिबिरांमधून ८९६ जणांमध्ये मौखिक कर्करोगाची प्राथमिक लक्षणे व त्यातून १२६ मौखिक कर्करोगाचे रुग्ण आढळून आल्याची बाब समोर आली आहे.’जागतिक तंबाखू नकार दिवसाच्यानिमित्ताने ही माहिती समोर आली आहे. २०१६-१७पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्य तंबाखूमुक्त करण्याच्या हेतूने सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यस्तरावरुन ३४ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.www.konkantoday.com