रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ७२ हजार ७२८ लोकांना मौखिक कॅन्सरविषयी समुपदेशन.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व विविध उपक्रमांच्या माध्यमातून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सोडविण्यासाठी साठी जिल्ह्यात आतापर्यंत आतापर्यंत ७२ हजार ७२८ लोकांना समुपदेशन करण्यात आले. ३७५ आरोग्य शिबिरांद्वारे २३ हजार ४०४ लोकांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तर जिल्हा, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात ओपीडी अथवा आरोग्य शिबिरांमधून ८९६ जणांमध्ये मौखिक कर्करोगाची प्राथमिक लक्षणे व त्यातून १२६ मौखिक कर्करोगाचे रुग्ण आढळून आल्याची बाब समोर आली आहे.’जागतिक तंबाखू नकार दिवसाच्यानिमित्ताने ही माहिती समोर आली आहे. २०१६-१७पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्य तंबाखूमुक्त करण्याच्या हेतूने सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यस्तरावरुन ३४ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button