
आगामी काळात प्लंबर्सचा उल्लेख वॉटर इंजिनिअर असा करण्याचा निर्णय.
देशातील अनेक शहरांची नावे बदलण्यात आल्याची गोष्ट अनेकदा आपल्या कानावर पडली असेल. मात्र, आता राज्य सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.आता राज्यातील प्लंबरचा दर्जा बदलण्यात येणार आहे. त्यानुसार आगामी काळात प्लंबर्सचा उल्लेख वॉटर इंजिनिअर असा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी प्लंबरचा दर्जा बदलून वॉटर इंजिनिअर असा करण्याचा विचार बोलून दाखवला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मजुरांना सन्मान मिळावा यासाठी काही व्यवसायांच्या नावात बदल केला जाणार असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले