
नगर परिषद व इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनेमांडवी बीचवर सुमारे २ टन कचरा गोळा.
अनंत चतुर्थीच्या गणेश विसर्जनाच्या दुसर्याच दिवशी बुधवारी रत्नागिरीतील मांडवी किनार्यावर नगर परिषद व इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी सुमारे दीड ते २ टन कचरा गोळा करण्यात आला.अनंत चतुर्थीला मंगळवारी गणेश विसर्जन रत्नागिरीत उत्साहात पार पडले. त्यानंतर या किनार्यावर निर्माण झालेला कचरा तातडीने दुसर्या दिवशी मंगळवारी सकाळी विविध आस्थापनांच्या सहकार्याने नगर परिषदेने स्वच्छता उपक्रम राबवला. यावेळी नगर परिषदेच्या आरोग्य विभाग, स्वच्छता विभागातील अधिकारी व सफाई कर्मचारी उपस्थित होते. www.konkantoday.com