एसटीतून फिरणार्‍या १३४ फुकट्या प्रवाशाना ३५ हजारांचा दंड.

एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या वर्षभरात रत्नागिरी विभागात भरारी पथकाकडून फुकट्या प्रवाशांवर करण्यात आली. त्यामध्ये १३४ प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केला असून अशा फुकट्या प्रवाशांकडून तब्बल ३५ हजार १११ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.एस्टीची सेवा ही शहराबरोबरच ग्रामीण लोकांची वरदायिनी मानली जाते. सध्या एसटीने विविध सवलत योजना आणल्या आहेत. शासनाने ७५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना ५० टक्के सवलत देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचा ओढा एस्टी बसेसकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांची संख्या जास्त असली तरी तरुण, तरुणींची संख्या वाढली आहे. याच एस्टी बसेसमधून हजारो प्रवासी जिल्हा अंतर्गत, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा यासह विविध ठिकाणी प्रवास करीत असतात. मात्र, प्रवास करताना विनातिकीट प्रवास करण्यांच्या संख्याही काही कमी नाही. यावेळी वाहक प्रत्येक प्रवाशांना तिकीट काढले आहे का विचारतात. अशामधूनही काही प्रवासी गर्दीचा फायदा घेऊन तिकीट काढत नाहीत. अशा विनातिकीट प्रवास करणार्‍यांविरोधात एस्टी महामंडळ सतर्क झाले आहे. आता फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button