
मुंबई-गोवा महामार्गासाठी ठेकेदारांना मुदतवाढ नाही -नितीन गडकरी.
मुंबई-गोवा महामार्गाचे गेल्या १४ वर्षापासून रखडलेल्या कामाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गंभीर दखल घेत ठेकेदारांना नो एक्स्टेशनचा इशारा दिला आहे. कामाला लागलेला विलंब आणि वाढणारा खर्च यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे सक्तीचे आदेश बजावले आहेत. तर या महामार्गाच्या रखडलेल्या कामांमुळे वाढीव खर्च २५० ते ३०० कोटींवर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.गेल्या १४ वर्षापासून काम अपूर्ण असल्याने शासनाला विरोधक आणि जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे केंद्रीय सार्वजनिक वाहतूक मंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री या राष्ट्रीय महामार्गाची वारंवार पाहणी करत आहेत.
अनेक हेडलाईन देण्यात आल्या होत्या परंतु काही या मार्गान खोट्या ठरवल्या आहेत. विशेष करून संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यातील दोन टप्प्याचे काम वर्षानुवर्षे रखडले आहे. शासनाने अनेक ठेकेदार कंपन्या बदलल्या परंतु काम काही पूर्ण झाले नाही. या दोन्ही टप्प्यांसाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी ठेकेदारांनी दिल्लीतील बैठकीत केली होती परंतु गडकरींनी ती फेटाळून लावली आहे व त्या मुदतीतच काम पूर्ण करण्याचे कंपन्यांना आदेश दिले. त्यामुळे आता अपूर्ण राहिलेले हे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.www.konkantoday.com