
साखरीनाटे परिसरातील लोकं महावितरण कार्यालयावर धडकणार
रत्नागिरी ः राजापूर येथील साखरीनाटे परिसरातील लोकं महावितरण कार्यालयावर धडकणार आहेत. जीर्ण झालेल्या वीज खांबांसह जुन्या वीजवाहिन्या बदलण्यासाठी सहा महिन्यापूर्वी साखरी नाट्ये परिसरातील लोकांनी महावितरण कंपनीकडे मागणी केली होती. सहा महिन्यापूर्वी मिळालेल्या आश्वासनांची पुर्तता अद्यापही न झाल्याने साखरीनाटे परिसरातील लोकांनी महावितरण विभागावर धडक देण्याचा निर्धार केला आहे