परजिल्ह्यातून रत्नागिरीत कोकण वासियांना आणण्याचा निर्णय पूर्व नियोजन आणि यंत्रणा उभारूनच घ्यावा- अॅड दीपक पटवर्धन

मुंबई सह परजिल्ह्यातून नागरिक रत्नागिरी मध्ये परतण्यासाठी स्वाभाविकपणे आतुर आहेत. मात्र कोरोनाग्रस्त शहरातून असे नागरिक रत्नागिरीत आणण्याची प्रवास व्यवस्था सहज होईल. मात्र अशा कोरोनाग्रस्त भागातून येणाऱ्या नागरिकांची
संख्या फार मोठी असू शकते त्यांना संख्यात्मक कोरंन्टाइन करण्याची व्यवस्था काय ? वैद्यकीय तपासणीची व्यवस्था काय ? त्यांचे रिपोर्ट मिरजला पाठवून रिपोर्ट येण्याची वाट पहात बसणार की रत्नागिरीत कोरोना रिपोर्टसाठी सेंटर उभारले जाणार? मोठ्या संख्येने येणारे नागरिक पहाता कोरोनाचा धोका दुर्दैवाने वाढला
तर उपलब्ध हॉस्पिटल्स, वैदयकीय अधिकारी व व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडेल त्या दृष्टीने या ही अतिरिक्त व्यवस्था कराव्या लागतील. या सर्वांसदर्भात जिल्हा प्रशासनाने येथिल जनतेला विश्वासात घ्यावे. अन्य जिल्ह्यातून घरी परतणाऱ्यांना प्रतिबंध करावा ही भूमिका नाही. मात्र व्यवस्था, सुविधा या प्रथम निर्माण
कराव्यात. जिल्ह्यामध्ये कोरोना रिपोर्टचे सेंटर शासनाने उपलब्ध करून दिलेले नाही. रिपोर्ट साठी मिरज वर विसंबून रहावे लागते हे दुर्दैव आहे. लाखोंच्या संख्येने नागरिक स्वगृही परतण्यासाठी आतुर आहेत त्यांना परत आणण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय केवळ लोक अनुमती असू नये तर सुरक्षिततेचे उपाय आणि व्यवस्था त्वरित उभी करून जनतेला त्याची स्पष्ट कल्पना देवून मगच कार्यान्वित
व्हावे अशी मागणी निवेदनाचे माध्यमातून दक्षिण रत्नागिरी भा.ज.पा अध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button