असाध्य आजार व अपंगत्व याच्यावर मात करून क्षितीज रहाळकरने अभूतपुर्व जिद्दीच्या जोरावर मिळवले दहावी परीक्षेत यश.

दहावीच्या परीक्षेत नेत्र दीपक यश मिळवणाऱ्या हुषार विद्यार्थ्यांचे नेहमीच कौतुक होत असते मात्र यापेक्षा अधिक मोलाचा आणि नवनिर्माण हायच्या दिर्घ परंपरेत सुवर्णाक्षरांनी नोंदवावा असा आनंद DMD ने आजारी आणि अपंगत्व असणार्या क्षितीज रहाळकर यांच्या १० वीतील अभूतपुर्व जिद्द आणि परिश्रमाने मिळवलेल्या यशाने सर्वांचे लक्ष वेधूनक्षितीजच्या या अदभूत यशस्वीतेत त्याची आई गौरी रहाळकर यांचे योगदान फार मोठे आणि आजच्या पालकांसाठी एक आदर्श आहे.क्षितिज वय वर्ष तीन असल्यापासून नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूल चा विद्यार्थी ड्यूशन मस्क्युलर डिस्ट्रॉफी DMD ह्या लाखात एकालाच होणार्या असाध्य आजाराने त्याला ग्रासले. इयत्ता चौथी पासून त्याला व्हीलचेअर सुरू झाली .जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याने काहीही झाले तरी मी याच शाळेतून दहावी पास होईल ही इच्छाशक्ती आणि याच बळावर क्षितिजणे आपल्याला असलेला हा असाध्य आजार सांभाळून आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले . बुध्दीबळ हा त्याच्या अत्यंत आवडीचा खेळ.DMD असलेले रुग्ण बहुतेकदा किशोरावस्थेच्या उत्तरार्धात किंवा २० व्या वर्षापर्यंतचे आयुष्य असते.

श्वसनाच्या अपुरेपणामुळे किंवा कार्डिओमायोपॅथीचा त्रास सहन करु शकत नाहीत. स्नायू डिस्ट्रोफीचा थेट नसांवर परिणाम होत नसल्यामुळे, स्पर्श आणि इतर संवेदना सामान्य असतात, जसे की मूत्राशय आणि आतड्यांमधील गुळगुळीत किंवा अनैच्छिक स्नायूंवर नियंत्रण जाते.आपल्या मुलाच्या आजाराची कल्पना आई वडिलांना होती. क्षितीज हा अत्यंत हुशार , बुध्दिमान आणि जिद्दी मुलगा. शालेय शिक्षण पुर्ण करणारच हा त्याचा ध्यास. नवनिर्माण ही त्याची विशेष आवडती शाळा. त्याच्या आईने क्षितीजचे विश्व हेच स्वत:चे विश्व ठरविले आणि त्याच्यासाठी तीने पुर्ण स्वत:ला झोकून दिले. रोज शाळेत घेऊन येत वर्गात बसविणे त्याला विविध वाचन खेळ यांत गुंतवत त्याच्या विस्तारीत प्रगल्भतेला अवकाश देणे. शाळेतील ॲाफीस बॅाय, मावशी ते सारे शिक्षक आणि सीमा मॅडम यांचा त्याच्यावर विशेष लळा होता. ह्याजिद्दीने क्षितीज सीबीएस्सी १० वा बोर्डात उत्तम मार्काने यशस्वी झाला. जीवन मरणाच्या एका माहित असणार्या अदृष्य रेषेवर क्षितीजचे हे यश विलक्षण रोमांचित करणारे आहे. नवनिर्माण हाय शाळेच्या गेल्या १९ वर्षाच्या वाटचालीतील अत्यंत अभिमान वाटावी अशी घटना.

या वाटचालीत प्राचार्य अरविंद पाटील, सोनाली मसुरकर, नाझिया , अल्मास लांबे, गौरव गोसावी, यांनी विशेष परिश्रम घेतले.ह्या वर्षी नवनिर्माण सांस्कृतीक महोत्सवात त्याने व्हील चेअरसह स्टेजवर जाऊन भाषण केले, त्याचा प्रत्येक शब्दात अंतरंगात उसळणार्या आनंदलहरी चेहर्यावर प्रतिबींबीत होत होत्या. सर्व मुलांसाठी तो एक जिगरबाज, महत्वाकांशी आयकॅान होता. दहावीला ६६% मार्क मिळाल्यावर त्याला लॅा शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. ती पुर्ण करण्याची शक्ती आणि आयूष्य त्याला मिळावे अशी प्रार्थना सर्वांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button