रत्नागिरी जिल्ह्यातील संगणक परिचालक पाच महिने वेतनाविना.

जिल्ह्यातील संगणक परिचालकांचे वेतन गेले पाच महिने रखडले आहे. नोव्हेंबर २०२४ पासून वेतनापासून वंचित असून त्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस कामाचा बोजा वाढत असून प्रशासकीय पातळीवरून कामासाठी दबाव आणला जात आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक कोंडीसह मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ८३२ ग्रामपंचायतींमध्ये १३५ पुरुष तर २७७ असे एकूण ४१२ संगणक परिचालक आहेत. बहुसंख्य संगणक प्रचालक या महिला आहेत. मात्र त्यांचे वेतन अनेक महिने थकविले गेल्याने त्यांची आर्थिक कोंडी होऊन त्यांच्यासमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button