
कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या गरीबरथ एक्सप्रेसमध्ये प्रवाशाची बॅग चोरीला, ३५ हजारांचा ऐवज लंपास.
गरीबरथ एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या प्रवाशाची बॅग चोरीला जावून रोख रक्कमेसह ३५ हजार रुपयांचा माल चोरीला गेला आहे. सदर घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत संद्रा सिरियक (मुंबई) यांनी संगमेश्वर येथील ठाण्यात फिर्याद दिली आहे. संद्रा सिरियक केरळ येथून सुट्टी संपवून शिक्षणाच्या ठिकाणी परत पनवेल येथे येण्यासाठी निघाले असता ८ मे रोजी रेल्वे स्टेशन येथून गरीबरथ एक्सप्रेस गाडीमधून प्रवास करीत असताना गाडी उडपी रेल्वे स्टेशन येथे आल्यानंतर त्यांना झोप लागली.
त्यानंतर ९ मे रोजी सकाळी ७ वाजता सदरची गाडी संगमेश्वर येथे आल्यानंतर त्यांना खिडकीजवळ ठेवलेली बॅग दिसून आली नाही. त्या बॅगमध्ये काळ्या रंगाचा ३० हजार रुपयांचा लॅपटॉप तसेच रोख रक्कम पाच हजार रुपये चोरीला गेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अज्ञात इसमाविरूद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमेश्वर रेल्वे स्थानक दरम्यान काही दिवसांपूर्वी विश्रांती कक्षातून दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. त्या चोरट्याला संगमेश्वर पोलिसांनी पकडले होते.www.konkantoday.com