
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा बंदरात खलाशाचा समुद्रात बुडून मृत्यू.
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील मद्यपी खलाशी समुद्राच्या पाण्यात पडला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दुखराम भागी राजी (वय ४३, रा. मिरकरवाडा जेटी, मुळः भजनीनकर, पालिका, जि. कैलाली नेपाळ) असे मृत खलाशाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १०) सायंकाळी सातच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली