पावसाच्या तोंडावर ठेकेदार जागा झाला, शीळ ते जॅकवेलपर्यंत पाईपलाईन टाकण्याची घाई .

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची साडेसहाशे मीटरची पाईपलाईन टाकण्यास ठेकेदाराला आता जाग आली आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना संबंधित ठेकेदाराने गेले वर्षभर रखडलेले पाईपलाईन टाकण्याचे काम आता सुरू केले आहे. गेल्या पावसाळ्यापूर्वी पाईपलाईन टाकण्याचे काम अर्धवट झाल्याने पाईपलाईन वाहून गेली होती. आता मान्सूनपूर्वी काम पूर्ण होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. गतवर्षी शीळ जॅकवेल कोसळल्यामुळे शहरातील पाणी प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर पर्याय म्हणून शीळ येथे नदीत फ्लोटींग जेटीवर पंप बसवण्यात आले आहेत. शीळ येथे सध्या पर्याय म्हणून तयार करण्यात आलेल्या ६ फ्लोटींग पंपांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु या पंपांच्या वीज बिलापोटी महिन्याला १० ते १२ लाख रुपये मोजावे लागत आहेत. वर्षाचा विचार केला तर ५४ लाखाच्या कामासाठी दीड कोटी रुपये नगर परुषिदेच्या तिजोरीतून खर्च झाले आहेत. न.प.च्या सुधारित पाणी योजनेमध्ये शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत सुमारे साडे ६०० मीटरच्या पाईपलाईनचा समावेश आहे. परंतु वर्ष उलटूनही पाईपलाईन टाकण्याच्यादृष्टीने अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत. गेल्या पावसाळ्यापूर्वी पाईपलाईन टाकण्याचे काम अर्धवट झाले होते. शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची ही पाईपलाईन आहे. गेल्या मुसळधार पावसाळ्यात टाकण्यात आलेले हे पाईप वाहून गेले होते. त्यामुळे पालिकेचे मोठे नुकसान झाले होते. आता ठेकेदाराने कामाला सुरुवात करून पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक खोदाई पूर्ण केली आहे. मे अखेरपर्यंत काम पूर्ण होणार की, गतवर्षीप्रमाणे पावसात ते काम अर्धवट राहणार, याकडे रत्नागिरीकरांच्या नजरा लागल्या आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button