
घाटकोपरचे जवान मुरली नायक ज्यांनी 5 पाकिस्तानींना ठार केले, नंतर शहीद झाले.
भारत आणि पाकिस्तानात संघर्ष सुरु झाला आहे. ऑपरेशन सिंदुर मोहिमेनंतर बिथरलेल्या पाकिस्तानी जवावांनी सीमेवरील गावात गोळीबार सुरु केला आहे. या गोळीबारात मुंबईतील घाटकोपर येथे राहाणारे मुरली नायक शहीद झाले आहेत.काश्मिर सीमेवर झालेल्या गोळीबारात पहाटे तीन वाजता अचानक केलेल्या गोळीबारात अनेक नागरिकांचे प्राण गेले आहेत.त्यात जवान मुरली नायक यांनी साहसाचे परिसीमा गाठत पाच अतिरेक्यांना कंठस्नान घातले.त्यात एका गोळीने त्यांचा वेध घेतला आणि ते शहीद झाले आहेत.
शहीद मुरली नायक यांनी मरेपर्यंत संघर्ष केला. आणि पाच अतिरेक्यांना ठार केले. त्यांच्या साहस आणि सर्वोच्च बलिदानाला देश कधीही विसरु शकणार नाही. ईशान्य मुंबईतील घाटकोपर पूर्व कामराज नगर येथे राहणारे आणि मुळचे आंध्रप्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील गोरंतला मंडलस्थित कल्ली थांडा, गड्ड्नथांडा पंचायत येथे राहणारे मुरली नायक यांच्या शहीद झाल्याचे वृत्त समजतात गावात सन्नाटा पसरला. संपूर्ण जिल्ह्यात वीर जवान मुरली नायक यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.