समुद्री शेवाळ शेतीच्या माध्यमातून नवा रोजगार उपलब्ध झाला.

अल्पभूधारक शेतकरी व मत्स्य व्यावसायिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कार्यरत जलजीविका ही नोंदणीकृत अशासकीय संस्था समुद्री शेवाळ शेतीच्या माध्यमातून एक नवा उपक्रम करत आहे. संस्थेने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध गावांमध्ये समुद्री शेवाळ शेतीविषयी प्रशिक्षण देवून महिलांना आणि शेतकर्‍यांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य हाती घेतले आहे.समुद्री शेवाळ ही सूक्ष्म वनस्पती असून ती उथळ समुद्रकिनार्‍याच्या पाण्यात तसेच खाडी भागात आढळते.

तपकिरी व लाल रंगातील शेवाळाचे उत्पादन व विक्री शाश्‍वत उत्पन्नाचे साधन ठरते. जलजीविका संस्थेचे नीलकांत मिश्रा मुख्य कार्यकारी अधिकारी, सुबोध कुमार मुख्य कार्यक्रम अधिकारी, चिन्मय दामले प्रकल्प व्यवस्थापक, सृष्टी सुर्वे, राज पवार, समृद्धी सनगरे प्रकल्प समन्वयक यांच्या सहाय्याने समुद्री शेवाळ शेतीवर मार्गदर्शन करताना तराफा बांधणी, अँकरिंग, रोपे लावणे अशा सर्व टप्प्यांचा समावेश असलेले प्रशिक्षण दिले जाते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button