पोलीस भरतीच्या नावाखाली राजापूर तालुक्यातील तरुणांची पाच लाखांची फसवणूक.

पोलीस भरतीच्या नावाखाली तरुणांची पाच लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील मोरोशी गावातील तरुणासोबत हा प्रकार घडला आहे.लवेश यशवंत कानडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. यानुसार ज्ञानेश पांचाळ याने लवेश याला विजय सुतार नावाचा आर्मी ऑफिसर ओळखतो आणि तो पोलीस भरतीसाठी मदत करू शकतो, असे भासवले. यानंतर पांचाळने डिसेंबर 2020 ते 12 ऑगस्ट 2024 या दरम्यान वेळोवेळी गुगल पेद्वारे फिर्यादीकडून एकूण 4 लाख 90 हजार 906 रुपये घेतले.

लवेश कानडे याने पांचाळ याच्याकडे पैशांबाबत विचारणा केली असता, तो टाळाटाळ करत होता. आज-उद्या पैसे देतो, अशी खोटी आश्वासने देत होता. अखेरीस त्रस्त होऊन लवेश कानडे याने राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन ज्ञानेश पांचाळ याच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button