
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठीच्या जुन्या पुलाची तोडफोड युद्धपातळीवर सुरू.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणात वाशिष्ठी नदीवर दोन नव्या पुलांची उभारणी झाल्यानंतर त्याच्या बाजूला असलेला आणि पावसाळ्यात पुराच्या पाण्याला अडथळा ठरणारा जुना ब्रिटीशकालीन पूल तोडण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या कोटीचा खर्च केला जात असून पावसाळ्यापूर्वी पूल तोडून पाण्याचा प्रवाह मोकळा केला जाणार आहे.अलिकडच्या म्हणजेच २००५ मध्ये आलेल्या महापुरानंतर सातत्याने चिपळूण शहराला पुराचा विळखा बसला आहे.
२००५ नंतर २०२१ मध्ये आलेला प्रलयंकारी महापूर चिपळूणला पुरते उध्वस्त करून गेला. शेकडो कोटींची आर्थिक व जीवितहानी या महापुरात झाली. २०२१ च्या महापुरात पाण्याच्या लोंढ्याने बहाद्दूरशेखनाका येथील वाशिष्ठी नदीवरील जुन्या दोन पुलांच्या मधील मातीच्या भरावाचा भाग वाहून गेला तसे पाहिले तर हा पूल सह्याद्रीतून वाहत येणार्या नदीतील पाण्याला अडथळा ठरत असल्याच्या तक्रारी पूर्वीपासूनच होत होत्या. दोन वर्षापूर्वीच्या महापुरात त्यावर अधिक शिक्कामोर्तब झाले. परिणामी पूल तोडण्याचा निर्णय घेण्यात आला.www.konkantoday.com