
रत्नागिरी जिल्हा परिषदेत सध्या अधिकारी व कर्मचार्यांना लागले बदल्याचे वेध ,जिल्हा परिषद प्रशासनाकडून लवकरच कार्यवाही सुरू होणार
रत्नागिरी जिल्हा परिषदेत सध्या अधिकारी व कर्मचार्यांना बदल्याचे वेध लागले असून, याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून लवकरच कार्यवाही सुरू होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत विविध विभागांतर्गत पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी बदल्या होणार असून, बदली पात्र असणार्या अधिकार्यांनी सोयीस्कर नेमणुकीसाठी फिल्डिंग लावली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीत विहित कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकारी, कर्मचान्यांना मे महिना आला की बदल्यांचे वेध लागत असतात. सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा स्तरावर कार्यकाल संपलेल्या जिल्हा परिषद अधिकार्यांकडूनही सोयीस्कर बदली मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचप्रमाणे कर्मचार्यांच्या प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांचीही माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे.