
निरूळ चिरेखाणीवर आढळलेल्या १३ बांग्लादेशींना १५ मेला परत पाठविणार, जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती.
. रत्नागिरी तालुक्यातील निरूळ येथील चिरेखाणीवर आढळून आलेल्या आणि भारतामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणार्या १३ बांग्लादेशीयांची १५ मे ला बांग्लादेशात रवानगी केली जाणार आहे. न्यायालयाने त्यांना ठोठावलेली ६ महिन्यांची शिक्षा १४ मे ला संपणार आहे. लगेच दुसर्या दिवशी त्यांना बांग्लादेशात पाठविण्यात येणार आहे.
त्यासाठी बांग्लादेश-भारताच्या बॉर्डरवरील सुरक्षा यंत्रणेच्या (बीएसएफ) ताब्यात दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादविरोधी पथकाला ११ नोव्हेंबर २०२४ एक माहिती मिळाली होती. पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांग्लादेशी नागरिक रहात आहेत. ह्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून १३ बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतले.www.konkantoday.com