
चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी सर्वंकश प्रयत्न ः आ. शेखर निकम
गेली २ ते ३ वर्षे वाशिष्ठी आणि शिव नद्यांमधील काळ उपशाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाला गती यावी, यासाठी जलसंपदा विभागाच्या जोडीला नाम फाऊंडेशनची यंत्रणाही दाखल झाली आहे. पुराचे पाणी शहरात शिरू नये, यासाठी शंकरवाडी-नलावडा बंधारा या ठिकाणी उभारण्यात येणार्या पूर नियंत्रण भिंतीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. बहाद्दूरशेखसह ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथे संरक्षक भिंतीची सुमारे ७० कोटींची कामे सुरू असल्याची माहिती देत चिपळूणच्या पुरमुक्तीसाठी सर्वंकष प्रयत्न केले जात असल्याची ग्वाही आमदार शेखर निकम यांनी बुधवारी दिली.www.konkantoday.com