
काश्मीरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन सतर्क
जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन घाटीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस देखील सज्ज झाले आहेत. संपूर्ण कोकण किनारपट्टीचा भाग संवेदनशील समजला जात असल्याने पोलिसांकडून २४ तास गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास नवीन चेकपोस्ट उभारण्याचा देखील निर्णय घेतला जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. कोकण किनारपट्टी भागात चेकपोस्ट तसेच संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी गस्त वाढवली असून चेकपोस्टवर संशयित वाहनाची चौकशी करुन तपासणी केली जात आहे. पोलिसांनी २४ तास गस्त सुरू ठेवला आहे. कोकण किनारपट्टीवरील लॅडिंग पॉइन्ट आहेत. त्या ठिकाणी २४ तास गस्त असणार आहे. संशयित गाड्यांची पोलीस तपासणी करत आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील पोलिसांनी गस्त वाढवली आहे.www.konkantoday.com